गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

शोध

जर पानगळ झालीच नाही तर नविन पालवी कशी येणार,तसेच जर ''मृत्यु नसेल तर नवा जीव कसा येणार'' पृथ्वीचा समतोल हा जन्म आणि मृत्यु ह्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे.जेव्हा नवीन जीव जन्माला येतो तेव्हा सोबत ''मृत्यु'' नावाचे  अटळ सत्य घेउनच येतो

शुभ्र उमदा मी एक अश्व
करीत पादाक्रांत हे विश्व
करावयाचा आहे शोध
घ्यावयाचा आहे बोध
.....................मृत्यूचा!
बाळगुन मनाशी जिद्द
चपल तनुत एक उमेद
नजरेत एकाच ध्येय
धावणार मी असाच आहे
......................सुसाट!
माझिया जन्मानेच मला
जीवन्मंत्र आहे दिला
येणार ना मरण तुला
.....................कधीही
पण,मनी ती एक आस
भेटावयाचे मरणास
संपणार कधी हा प्रवास
एकचि ध्यास तो खास
....................अंतरात
आणि अशाच एका दिनी
यश प्राप्तिले प्रयत्नानी
पाहिले मरणाचे रूप
ते तर होते प्रतिरूप
....................जन्माचे!
मृत्युस त्या भेटता तत्क्षणी
टोल माझा खोल जाऊनी
भावना,वेदना लोपल्या
नव्हत्याच आत्ता कोठल्या
........................जाणिवा!
परतून पुन्हा होतो जन्मत
तोच मी,आत्माही तोच
बदलली केवळ काया
नव्या रुपात आता कराया
...........................मार्गक्रमण!
फ़क्त गाडी ती बदलीत
या गाडीतून त्या गाडित
पुन्हा एकदा तोच प्रवास
तोच मार्ग शोधण्याचा
........................मृत्युस.





२ टिप्पण्या: